नारंगी धरणातून 5 दरवाजे उघडून 1500 क्युसेक वेगाने पाणी सोडले

Foto
वैजापूर
 शुभम लुटे 
 नारंगी सारंगी धरणाच्या वर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नारंगी धरणातून 5 दरवाजे उघडून  1500 क्युसेक  वेगाने पाणी सोडण्यात आले त्यामुळे धरण परिसरातील भिल्ल वस्ती  दत्तवाडी येवला नाका पूल  हा परिसर संपूर्ण पाण्याखाली गेला आहे  
 प्रशासनाने या परिसरातील रहिवाशांना मंगल कार्यालयामध्ये हलवण्यात आले आहे अनेक नागरिकांचे संपूर्ण घरे पाण्यामध्ये वाहून गेले आहे 
 पाण्याचा वेग इतका आहे  की नांदगाव जवळील  अनेक गावांना जोडणारा पूल वाहून गेला आहे  त्यामुळे लाख खंडाळा पानवी  सुरेगाव जरूळ या गावांचा संपर्क तुटला आहे 
 भिल्ल वस्तीतील लोकांना प्रशासनाने इतरत्र  हलवण्याचे आदेश दिले आहेत  
 डॉक्टर दिनेश परदेशी आ रमेश बोरणारे उपविभागीय अधिकारी अरुण जराड  तहसीलदार सुनील सावंत मुख्याधिकारी भागवत भिगोत व नगरपालिका कर्मचारी यांनी नागरिकांना हलवण्यासाठी मदत केली  रात्री बारा वाजेपासून सर्व प्रशासन अलर्ट मोड वर आहे 

 पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास पाण्याचा अजून वेगाने विसर्ग करण्यात येईल  असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे